२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण | शालेय मुलांसाठी भाषण
अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग, आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो – आपल्या सर्वांना माझा नमस्कार!
सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. दरवर्षी आपण २६ जानेवारी हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करतो. आज मी तुम्हाला या दिवसाचे महत्त्व थोडक्यात सांगणार आहे.
प्रिय मित्रांनो, आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण आपल्याकडे देश चालवण्यासाठी स्वतःचे नियम नव्हते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी खूप परिश्रम घेऊन भारतीय संविधान तयार केले. २६ जानेवारी १९५० रोजी आपले संविधान लागू झाले आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. म्हणूनच दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो.
आज आपण सर्वांनी भारतीय ध्वजासमोर उभे राहून सलामी दिली. तो तिरंगा पाहून आपल्या मनात अभिमान निर्माण झाला. तो आपल्याला एकतेचा आणि शौर्याचा संदेश देतो.
या दिवशी राजधानी दिल्ली येथे भव्य परेड काढली जाते. भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल आपली ताकद दाखवतात. विविध राज्यांची झांकी निघते ज्यातून भारताची संस्कृती दिसते. शूर सैनिकांना, पोलीस दलाला आणि मुलांना देखील शौर्य पुरस्कार दिले जातात. ही परेड पाहताना प्रत्येक भारतीयाचे डोळे अभिमानाने भरून येतात.
प्रिय मित्रांनो, आपण लहान आहोत पण आपल्यावरही काही जबाबदाऱ्या आहेत.
- शाळेत मन लावून अभ्यास करणे
- आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे ऐकणे
- स्वच्छता ठेवणे
- कोणाला त्रास न देणे
- झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे
आज आपण स्वातंत्र्यसैनिकांची आठवण ठेवली पाहिजे. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार पटेल – या सर्वांनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्यामुळेच आपण आज मोकळेपणाने शाळेत येऊ शकतो, खेळू शकतो आणि शिक्षण घेऊ शकतो.
आपल्या संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क दिला आहे. कोण मोठा, कोण लहान – हे पाहिले नाही पाहिजे. आपण सर्व भारतीय आहोत, हेच आपले खरे ओळखपत्र आहे. जातीभेद, भांडण, द्वेष यांना आपल्या समाजात जागा नसावी.
देशासाठी मोठी कामे करणे हीच देशसेवा नाही. आपल्या छोट्या कृतीतूनही देशप्रेम दिसते. शाळेच्या प्रांगणात कचरा न टाकणे, पाणी वाया न घालवणे, मित्रांशी प्रेमाने वागणे – हीच खरी देशभक्ती आहे. आपण असेच चांगले काम करत राहिलो तर आपला भारत नक्कीच प्रगती करेल.
शेवटी मी एवढेच सांगेन की, आपण सर्वांनी दररोज देशासाठी काहीतरी करण्याची शपथ घ्यावी. अभ्यासात, खेळात, वागण्यात नेहमी प्रामाणिक राहूया. आपल्या संविधानाचे पालन करूया आणि इतरांनाही सांगूया.
चला, आपण सर्व मिळून जोरात म्हणूया –
🇮🇳 भारत माता की जय!
जय हिंद! जय भारत! 🇮🇳
📢 प्रिय वाचकांनो
हे भाषण तुम्हाला आवडले असेल तर कृपया तुमचे विचार खाली कमेंट मध्ये नक्की लिहा. ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि आमच्या मराठी वाचनालय ब्लॉगला Follow करायला विसरू नका, जेणेकरून अशाच छान छान पोस्ट तुम्हाला सर्वप्रथम वाचायला मिळतील.